महाबलीपुरम : युनेस्को वारसा पर्यटन स्थळ|Mahabalipuram: UNESCO Heritage Tourism Site

https://cdn.ampproject.org/v0/amp-auto-ads-0.1.js तमिळनाडूच्या कोरोमंडल किनाऱ्यावर वसलेले महाबलीपूरम (मामल्लपुरम) हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. पल्लव राजवटीत (७वे–८वे शतक) हे कला, संस्कृती आणि व्यापाराचे केंद्र होते. येथील स्मारकांची खासियत म्हणजे प्रचंड ग्रॅनाइट खडकातून साकारलेली अप्रतिम शिल्पकला.बंगालच्या उपसागराच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले शोर मंदिर, पंच रथांची भव्य शिल्पसंपदा आणि ‘गंगावतरण’ किंवा ‘अर्जुनाची तपश्चर्या’ ही विशाल शिल्पपट ही महाबलीपूरमची खास... Continue Reading →

कोणार्क सूर्य मंदिर: सांस्कृतिक वारसा स्थळ|Konark Sun Temple: Cultural Heritage Destination

कोणार्क येथील सूर्य मंदिर हे भारताच्या स्थापत्य वैभवाचे आणि सांस्कृतिक वारशाचे भव्य उदाहरण आहे. ओडिशामध्ये वसलेले हे मंदिर इ.स. १३व्या शतकात पूर्व गंग राजवंशातील राजा नरसिंहदेव प्रथम यांनी बांधले. सूर्यदेवाला अर्पण केलेले हे मंदिर रथाच्या अद्वितीय आकारात उभारले गेले असून त्याला बारा सुंदर कोरीव दगडी चाकं आणि सात घोडे आहेत, जे सूर्याच्या आकाशातील प्रवासाचे प्रतीक... Continue Reading →

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले|Forts of Chhatrapati Shivaji Maharaj

https://cdn.ampproject.org/v0/amp-auto-ads-0.1.js मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणजे काय? भारतातील मराठा लष्करी लँडस्केप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याने उभारलेली किल्ल्यांची रणनीतिक साखळी होय. महाराष्ट्रातील डोंगराळ भाग, सह्याद्रीच्या कड्यावर आणि किनारपट्टीवर पसरलेले हे किल्ले – जसे रायगड, राजगड, प्रतापगड – उत्कृष्ट डोंगरी वास्तुकला, बचावात्मक रचना आणि गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचे दर्शन घडवतात. १७  व्या ते १९व्या शतकादरम्यान उभारले... Continue Reading →

त्रिरश्मी पांडव लेणी । Trirashmi Pandav leni

त्रिरश्मी पांडवलेणी महाराष्ट्रातील नाशिक शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर त्रिरश्मी डोंगरामध्ये आहेत. प्राचीन भारतातील सातवाहन, कलचुरी आणि वाकाटक या घराण्यातील राजांनी ही लेणी खोदलेली आहेत. प्राचीन कल्याण ते नाशिक या व्यापारी मार्गावर ही लेणी आहेत. जवळपास 250 पायऱ्या चढून गेल्यानंतर पांडवलेणी दृष्टीपथात येतात.पांडवलेणी येथे एकूण 24 बौद्ध लेणी आहेत.येथील लेण्यांमध्ये गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या प्रतिमा... Continue Reading →

सिंधू संस्कृती : पुरातत्त्वीय पर्यटन स्थळे |Indus Valley Civilization : Archaeological Tourist Sites

हडप्पा संस्कृतीची स्थळे पुरातत्त्वीय पर्यटनाच्या दृष्टीने अत्त्यंत महत्त्वाची आहेत.  सिंधू संस्कृतीला  हडप्पा संस्कृती, ब्राँझ युगीन संस्कृती या नावानेही ओळखले जाते. सिंधू संस्कृती मधील लोकांनी जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती केली होती. भारतामध्ये अश्मयुगानंतर मानवी प्रगती मधील सर्वात महत्वपूर्ण कालखंड म्हणजे ताम्रपाषाण युग होय. धातु युगाच्या प्रारंभी मानवाने तांब्यापासून विविध अलंकार व उपकरणे बनविले. ज्या काळात मानवाने... Continue Reading →

राजस्थान पर्यटन : पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावे असे वारसा ठिकाण|Rajasthan Tourism: Heritage places that tourists must visit

भारताचे सर्वात मोठे राज्य असलेले राजस्थान हे इतिहास, संस्कृती, परंपरा, निसर्गसौंदर्य आणि राजेशाही वैभव यांचा सुंदर संगम आहे. “राजांची भूमी” म्हणून ओळखले जाणारे राजस्थान आपल्या भव्य किल्ल्यांसाठी, आलिशान महालांसाठी, रंगीबेरंगी सण-उत्सवांसाठी आणि अजिंक्य राजपुताना शौर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या वाळवंटी भूमीतील प्रत्येक शहर धैर्य, प्रेमकथा आणि कलात्मक वैभवाच्या कथा सांगते, त्यामुळेच राजस्थान हे भारतातील सर्वात... Continue Reading →

विद्यापीठ शिक्षण पद्धती | Univrsity Education System                                   

विद्यापीठ शिक्षण पद्धती प्राचीन भारतातील शैक्षणिक उत्क्रांतीमधील महत्वपूर्ण टप्पा मानला जातो. भारतात आलेल्या चिनी प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून तसेच प्राचीन विद्यापीठे ज्या ठिकाणी अस्तित्वात होती त्याठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननातून मिळालेल्या अवशेषांवरून प्राचीन भारतातील प्रमुख विद्यापीठांची माहिती मिळते. उत्तर भारतामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी आणि काशी ही विद्यापीठे विशेष प्रसिद्ध होती. तर दक्षिण भारतात मंदिरामध्ये शिक्षण देण्याचे... Continue Reading →

अजिंठा लेणी:चित्रकला, शिल्पकला आणि वास्तुकलेचा समृद्ध वारसा|Ajanta Caves: A rich heritage of paintings,sculptures and architecture

अजिंठा लेणी प्रामुख्याने चित्रकलेसाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील  चित्रकलेवर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे; असे असले तरी कलाकारांनी मानवी जीवनातील इतर अंगांचाही चित्रकलेमध्ये समावेश केला आहे. विशेषतः गौतम बुद्धाचे विविध रूपातील चित्रण या लेण्यांमध्ये पहावयास मिळते.मानवी भावनांच्या अभिव्यक्तीचे एक साधन म्हणून प्राचीन भारतातील कलाकारांनी चित्रकलेचा उपयोग केला. भाषेचा विकास होण्यापूर्वी मानव सर्वप्रथम चित्रकलेकडे वळला असावा.... Continue Reading →

Start a Blog at WordPress.com.

Up ↑